Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती व तिरूपती बालाजी समंध

#तिरुपती बालाजी मंदिर #मराठ्यांनी मुक्त केल मुघलाचा ताब्यातून.. 🚩🚩
 इसवीसन  १५६५ मध्ये मुघल #सुलतानानी एकत्र येऊन विजयनगर  साम्राज्यावर हल्ला चढवला व त्यात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला
 #विजयनगर साम्राज्याचा शेवटचा हिंदू राजा रामरायाचे मुंडके  कापून आदिलशहाने सैन्याचे हवाली केले.. आदिलशहाच्या सैन्याने #रामरायाचे मुंडकं भल्याला लटकवून पूर्ण #हम्पी शहरात फिरवले हम्पी शहरात लूटपाट अत्याचार बलात्कार केलं मंदिर लुटली  रामरायाच्या एक लाख सैन्याच्या कत्तली केल्या व हम्पी शहराला आग लावली
 त्यानंतर #विजयनगर साम्राज्यचा अस्थ झाला
पुढे दख्खनवर मग मुस्लिम सुलतानी वर्चस्व आले 
 परंतु कालांतराने #नायकवंशी राजांनी दक्षिण भारतावर आपले साम्राज्य पसरवले, मुघलानी केलेल्या मंदिराची तोडफोड त्याचा जीर्णोद्धार नागवंशी राजांनी केला होता मंदिर पुनर्निर्माण केली होती, 
परंतु दक्षिण भारतामध्ये हिंदू #नायकवंशाचा विरोधात मुस्लिम शासकनी  युद्ध केलं 
दक्षिणेतील मुस्लिम शासक यांनी  नायक वंशातल्या शेवटच्या हिंदूराणी #मीनाक्षीचा पराभव करून त्यांना कैद केले..
 नायकवंशी #हिंदूशासक महाराणी मीनाक्षी ने कैदेत असताना विष प्राशन करून आत्महत्या केली 

 अशाप्रकारे #नायकवंशी राजानवरही अली खान  व त्याचा दोस्त #चंदासाहेब या मुस्लिम शासकानी विजय मिळवला.

 व पुढे त्यांची नजर  #तंजावरच्या मराठ्यांच्या #साम्राज्यावर पडली
 मुगल शासक नवाब #मराठ्यांशी पंगा घ्यायला निघाले

तंजावरचे #प्रतापसिंग भोसले यांनी हिंदू नृपती चक्रवती सम्राट शाहू महाराजांना मदत मागितली 

हिंदू नृपती #शाहू महाराज यांच्या आदेशावरून #रघुजीराजे भोसले नागपूर येथून व #फत्तेसिंहराजें भोसले अक्कलकोट येथून सोबत निघाले नागपुर वरून  नांदेड व हैदराबाद हुण कर्नाटकला पोहचले
पुढे रघुजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात २० में १७४० मध्ये तमलचेरी घाटीत
#मराठा सेना व नवाब व त्याचा दोस्त आली खान मध्ये मोठ युद्ध झाले.. या #युद्धात अली खान व त्याचा मुलगा हसन खान #मराठ्यांच्या हातून मारला गेला..
 मराठ्यांनी #कर्नाटक राज्य वर विजय मिळवला
 #कर्नाटक राज्य मराठ्यांच्या राज्यात सामील झाले
 मराठ्याचा कडून झालेला #पराभव पाहून मराठ्याना घाबरुन
 नवाब चंदासाहेब #तिरुचिरापल्ली तामिळनाडूला पळून गेला

 पुढे नवाब #चंदासाहेबचा भाऊ #बडासाहेब खान  मराठ्यांना रोखायला आला पण मराठ्यांनी त्याला रस्त्यातच आडवा केला युद्धात ठार केलं...🚩🚩

पुढे तामिळनाडू  #तिरुचिरापल्ली किल्ल्यात लपून बसलेला नवाब चंदासाहेब मराठ्यांना शरण आला...
 रघुजीराजेचा  कैदेत असलेला नवाब चंदासाहेब खान याने  रघुजीराजे भोसले यांना त्याला कैदेतून मुक्त करण्यासाठी म्हणून त्यावेळच्या आठ लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केला
 त्याला कुठे माहिती मराठा लढतो ते देवधर्म  स्वराज्यासाठी  दागिन्यासाठी किंवा वतनासाठी नाही..
 रघुजीराजे भोसले यांनी त्या आठ लाखला लाथ मारली व कैद केलेल्या नवाब चंदासाहेबला राजधानी सातारला कैदेत टाकण्यासाठी हिंदू नृपती शाहू महाराजांकडे पाठवून दिले

 दक्षिण भारतवर मिळवलेल्या विजयामुळे रघुजीराजे भोसले हें आंध्र प्रदेशातील  चित्तूर जिल्हा असलेल्या भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले त्यावेळी त्यांनी तिरुपती बालाजीला हिरे माणके सोन्याचे दागिने अशी मौल्यवान  अशी त्या काळात एक लाख बेचाळीस हजाराची आभूषणे तिरुपती बालाजीला अर्पण केली
 ज्याची किंमत आज करोडों मध्ये आहे..
 ते दागिने आज पण रघुजीराजेचा नावाने तिरुपती संस्थान कडे उपलब्ध आहेत जे मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतात

 मराठ्यांच्या शासन कालामध्ये तिरुपती बालाजीचा विकास झाला.. विदेशी आक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी रघुजी राजे भोसले यांनी मंदिर सुरक्षासाठी सैनिक तैनात केले होते
 येणाऱ्या भक्तांसाठी धर्मशाळा भक्त निवास निर्माण केले अन्नछत्र  सुरु केले होते,
महाराष्ट्रातील भक्तांसाठी 
 रस्त्याची निर्मिती केली...... जेणेकरून महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीला दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी  सोईस्कर होईल 

 तिरुपती बालाजी चा  दुसरा ब्रह्मोत्सव साजरा होतो तो मराठ्यांनी सुरू केला आहे जो अजूनही होतो..

 अशाप्रकारे तिरुपती बालाजी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील मराठ्यांचं गौरवशाली इतिहासाच वैभवच आहे जे मराठ्यांनी मुघलांच्या तावडीत मुक्त केले होतें...
 त्याआधी छत्रपती #शिवरायांनी  दिनांक  ४  मे १६६७ रोजी 
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं होतं त्यावेळी पुरुषोत्तम भटाना सनद दिली होती ती आज पण उपलब्ध आहे त्या सनदेनुसार
 छत्रपती शिवरायांनी
तिरुपती बालाजी सेवेसाठी वार्षिक तीस (३०) होन, नंदादीपसाठी वार्षिक  बारा (१२) होन, अभिषेकासाठी बारा होन  (१२ )होन,
पुरोहित पुरुषोत्तम भटाला पूजेसाठी वार्षिक तीस (३०) होन
 रोजच्या #अन्नछत्रसाठी एकूण तीनशेसाठ (३६० ) होन देत होते.
 दर्शनाच्या दरम्यानच छत्रपती शिवरायांनी  एका वर्षाच द्रव्य पुरुषोत्तम भटाचा स्वाधीन केले होते .. 🚩🙏
छत्रपती शिवरायांची तिरुपती बालाजीवर नितांत श्रद्धा होती दिसून येते..🙏🚩

जे  शिवभक्तीच्या नावाखाली तिरुपती बालाजीला शिव्या देतात त्यांचे पोस्टर फाडतात वा तिरुपती बालाजी नको आम्हाला बोलतात अशांना छत्रपती शिवरायांच्या विषयी खरंच आदर प्रेम निष्ठा कमी तिरुपती बालाजी विषयी द्वेष दिसून येतोय..

 छत्रपती शिवरायांच्या विषयी जो कोणी विरोध करतो त्याला जाग्यावर फोडला पाहिजे होता पण  तें लोक तस न करता तिरुपती बालाजीला शिव्या देते पोस्टर फाडून शिवभक्ती दाखवत आहेत.. ती शिवभक्ती छत्रपती शिवरायांना मान्य नसेल कारण मुघलांनी  ज्या हिंदू मंदिरावर आक्रमण केली मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली त्यांना विरोध केला होता त्यांचा कोथळा काढला होता.. ना की देवाला शिव्या देत बसले...

 छत्रपती शिवरायांनी  त्यानंतर त्यांच्या नातु हिंदू नृपती चक्रवर्ती सम्राट शाहू महाराज यांनी अर्थातच मराठ्यांनी  तिरुपती बालाजीचं रक्षण केलं आहे व श्रद्धा ठेवली आहे.. आपण त्या श्रद्धेचा  आदर ठेवला पाहिजे.🙏🚩 व त्या तिरुपती बालाजी मंदिराला आपल्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आहे  विसरता कामा नये त्यापासून दूर होता कामा नये 🙏🚩

जय वेंकटरमना गोविंदा 🙏🚩
 जय छत्रपती शिवराय 🚩🚩
 जय हिंदू नृपती  सम्राट चक्रवर्ती शाहू महाराज 🚩🚩

- वंदना संतोष भोसले यांच्या फेसबुक वरून

Post a Comment

0 Comments