Ticker

6/recent/ticker-posts

बांबू देतेय आर्थिक दिशा आणि ऊर्जा

 बांबू देतेय आर्थिक दिशा आणि ऊर्जा



भोर तालुक्यातील पश्चिम भागात ठरतेय नगदी पीक

भोर तालुक्यातील पश्चिम भागात एक महत्त्वाचे पीक म्हणून बांबूचा उल्लेख ग्रामुख्याने करावा लागेल . बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे असल्याने येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे . शेती , हस्तकला , बांधकाम , फर्निचर , विविध वस्तू , कागद उद्योग , वाद्य निर्मिती आणि खाद्य इत्यादीसाठी बांबूचा वापर केला जातो . त्यामुळेच तालुक्यात आर्थिकदृष्ट्या दिशा आणि ऊर्जा देणारे हे प्रमुख साधन आहे .

हिरडस मावळातील हिर्डीशो खोन्यातील . नौरा देवघर धरणाच्या दोन्ही बाजूचा परिसर म्हसर खोरे याठिकाणी बांबूची बेटे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत . आपटी , नांदगाव , कारी खोरे , आंबवढे खोरे या भागात ही बांबूची बेटे आहेत . त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पत्र होत असल्याने , तसेच हिर्डीशी भागात नीरा देवघर हे धरण २००० साली बांधण्यात आल्याने भागातील लोकांच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत , त्यामुळे प्रमुख उत्पन्नाचे मोत असणारी शेती राहिली नसल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी पुणे , मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागत आहे , तर काही मिळेल तो कामधंदा करून आपली उपजीविका भागवत आहेत .

एकंदरीत धरण झाल्यापासून या भागातील नागरिकांची आर्थिक परस्थितो खालावली आहे.त्यामुळे हमखास उत्पन्नाचे साधन असलेल्या बांबू शेतीकडे शेतकरी वळत आहेत , त्यामुळे या भागातच एखादा बाबू विषय प्रकल्प , बांबूपासून वस्तू बनविण्याचा कारखाना किंवा बांबूपासून या भागातील तरुणांना रोजगार मिळेल , शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल यासाठी प्रशासन तसेच राजकीय प्रतिनिधींनी या बांबू शेतीकडे लक्ष देऊन येथील बेरोजगार युवकांना रोजगार व शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची खरंच गरज असल्याचे भागातील नागरिकांकडून विशेष युवक वर्गाकडून बोलले जात आहे .

लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न बांबू जलद गतीने वाढणारी , सदाहरित , दीर्घायू वनोपज आहे . याचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही . कमी - जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही , तसेच डोंगर उतारावरील जमिनीवरही बांबूची लागवड करता येते . त्यामुळे लागवड केल्यानंतर थोडी काळजी घेतल्यावर खात्रीशीर उत्पन्न बांबू लागवडीच्या तिसऱ्या वर्षापासून मिळायला सुरुवात होते .

हिंडोर्शी भागातील शेतकरी बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात बांबूचा योग्य मोबदला मिळण्यासाठी बांबूपासून वस्तू निर्मितीसंबंधी जनजागृती करणे गरजेचे असून कृषी , वन , तसेच बांबूविषयी शासकीय संस्था यांनी या भागात येऊन कार्यशाळा भरवून बांबू सबंधित असणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यापासून भागातील शेतकऱ्यांना व युवकांना रोजगार उपलब्ध करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करावी . - सुधीर शिरवले , माजी सरपंच , शिरवली हि . मा . 

भोरला बांबू फर्निचर युनिट लवकरच सुरू होणार आहे . मशिन उपलब्ध असूण युनिट चालवण्यास ट्रेनिंग देण्यात येणार आहे . कोरोनाची स्थिती पाहुन भाटघर येथील बांबू ट्रिटमेंट ची नविन बॅच सुरू करणार आहे . तसेच नसरापूर येथे बांबू डेपो चालू करून लिलाव पध्दत चालू करण्यात येणार आहे . त्यामुळे शेतकन्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होईल . शेतकन्यानी अटल बाबू समृध्दी योजनेंतर्गत बांबू रोपे लागवडी संदर्भात लाभ घ्यावा - दत्तात्रय मिसाळ , वनपरिक्षेत्र अधिकारी , भोर

साभार प्रभात पेपर 27/02/2021

Post a Comment

0 Comments